शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सांगली कारागृहात झोपायला नाही जागा-कैद्यांची संख्या साडेचारशेवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 22:58 IST

वाढत्या गुन्हेगारीमुळे सांगलीचे जिल्हा मध्यवर्ती कारागृह कैद्यांच्या संख्येने सातत्याने खचाखच भरत आहे. २३५ क्षमता असलेल्या या कारागृहात

ठळक मुद्देकारागृह अन्यत्र स्थलांतर करण्याची प्रशासनाची मागणी शासन दरबारी प्रलंबित आहे.कैद्यांच्या सुरक्षेचा भार पेलताना कारागृह प्रशासनास तारेवरची कसरत करावी लागत आहे

- सचिन लाड

सांगली : वाढत्या गुन्हेगारीमुळे सांगलीचे जिल्हा मध्यवर्ती कारागृह कैद्यांच्या संख्येने सातत्याने खचाखच भरत आहे. २३५ क्षमता असलेल्या या कारागृहात कैद्यांच्या संख्येचा आकडा पाचशेच्या दिशेने जात आहे. सध्या ४५२ कैदी आहेत. यामध्ये २२ महिलांचा समावेश आहे.

वाढत्या संख्येमुळे कैद्यांना झोपायला जागा नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व कैद्यांच्या सुरक्षेचा भार पेलताना कारागृह प्रशासनास तारेवरची कसरत करावी लागत आहे.जिल्'ातील गुन्हेगारीचा आलेख नेहमी चढ-उताराचा राहिला आहे. गेल्या काही महिन्यात गुन्हेगारीचा आलेख वाढला आहे. त्यामुळे कारागृहात कैद्यांची संख्या वाढत आहे.

खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण आणि बलात्कार या गुन्तील कैद्यांची संख्या मोठी आहे. दररोज चार-पाच कैदी नव्याने दाखल होत आहेत. पण त्यांचे सुटण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. आठवड्यातून तीन ते चार कैदीच जामिनावर बाहेर पडत आहे. कैद्यांच्या वाढत्या संख्येमुळे कारागृह अपुरे पडत आहे. कारागृह अन्यत्र स्थलांतर करण्याची प्रशासनाची मागणी शासन दरबारी प्रलंबित आहे. राजवाडा चौकात भरवस्तीत हे कारागृह आहे. आजूबाजूला लोकवस्ती व टोलेजंग इमारती उभारल्या आहेत. कारागृहात काय सुरू आहे, हे इमारतीमधून सहजपणे दिसून येते. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

तीन वर्षापूर्वी कारागृहाच्या तत्कालीन महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांनी कारागृहास भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतला होता. स्थलांतरासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली होती. पण पुढे काहीच झाले नाही. कैद्यांची वाढती संख्या कारागृह प्रशासनाच्याद्दष्टीने धोक्याची घंटा बनली आहे. कैद्यांच्या तुलनेत तेवढी सुरक्षा यंत्रणाही नाही.

सकाळी व सायंकाळी अशा दोन सत्रात नऊशे कैद्यांचा स्वयंपाक करावा लागत आहे. पहाटे तीनपासून स्वयंपाकाचे काम सुरू करावे लागते, तर रात्रीच्या जेवणासाठी दुपारी बारापासूनच स्वयंपाकास सुरुवात होते.कळंब्यात दीडशे कैदीखून, खुनाचा प्रयत्न, खंडणी अशा गंभीर गुन्'ातील दोन डझनहून टोळ्यांना गेल्या तीन-चार वर्षांत पकडण्यात आले. यामध्ये दीडशेहून गुंड कायद्याच्या कचाट्यात सापडले. सुरक्षेच्या कारणास्तव या गुंडांना कारागृह प्रशासनाने येथे न ठेवण्याची विनंती न्यायालयास केली. न्यायालयानेही ही विनंती मान्य करून या गुंडांना कोल्हापुरातील कळंबा कारागृहात हलविण्याचा आदेश दिला. या गुंडांना सांगली कारागृहात ठेवले असते तर, आज कैद्यांची संख्या सहाशेच्या पुढे गेली असती.

 

टॅग्स :Sangliसांगलीjailतुरुंग