शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

सांगली कारागृहात झोपायला नाही जागा-कैद्यांची संख्या साडेचारशेवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 22:58 IST

वाढत्या गुन्हेगारीमुळे सांगलीचे जिल्हा मध्यवर्ती कारागृह कैद्यांच्या संख्येने सातत्याने खचाखच भरत आहे. २३५ क्षमता असलेल्या या कारागृहात

ठळक मुद्देकारागृह अन्यत्र स्थलांतर करण्याची प्रशासनाची मागणी शासन दरबारी प्रलंबित आहे.कैद्यांच्या सुरक्षेचा भार पेलताना कारागृह प्रशासनास तारेवरची कसरत करावी लागत आहे

- सचिन लाड

सांगली : वाढत्या गुन्हेगारीमुळे सांगलीचे जिल्हा मध्यवर्ती कारागृह कैद्यांच्या संख्येने सातत्याने खचाखच भरत आहे. २३५ क्षमता असलेल्या या कारागृहात कैद्यांच्या संख्येचा आकडा पाचशेच्या दिशेने जात आहे. सध्या ४५२ कैदी आहेत. यामध्ये २२ महिलांचा समावेश आहे.

वाढत्या संख्येमुळे कैद्यांना झोपायला जागा नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व कैद्यांच्या सुरक्षेचा भार पेलताना कारागृह प्रशासनास तारेवरची कसरत करावी लागत आहे.जिल्'ातील गुन्हेगारीचा आलेख नेहमी चढ-उताराचा राहिला आहे. गेल्या काही महिन्यात गुन्हेगारीचा आलेख वाढला आहे. त्यामुळे कारागृहात कैद्यांची संख्या वाढत आहे.

खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण आणि बलात्कार या गुन्तील कैद्यांची संख्या मोठी आहे. दररोज चार-पाच कैदी नव्याने दाखल होत आहेत. पण त्यांचे सुटण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. आठवड्यातून तीन ते चार कैदीच जामिनावर बाहेर पडत आहे. कैद्यांच्या वाढत्या संख्येमुळे कारागृह अपुरे पडत आहे. कारागृह अन्यत्र स्थलांतर करण्याची प्रशासनाची मागणी शासन दरबारी प्रलंबित आहे. राजवाडा चौकात भरवस्तीत हे कारागृह आहे. आजूबाजूला लोकवस्ती व टोलेजंग इमारती उभारल्या आहेत. कारागृहात काय सुरू आहे, हे इमारतीमधून सहजपणे दिसून येते. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

तीन वर्षापूर्वी कारागृहाच्या तत्कालीन महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांनी कारागृहास भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतला होता. स्थलांतरासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली होती. पण पुढे काहीच झाले नाही. कैद्यांची वाढती संख्या कारागृह प्रशासनाच्याद्दष्टीने धोक्याची घंटा बनली आहे. कैद्यांच्या तुलनेत तेवढी सुरक्षा यंत्रणाही नाही.

सकाळी व सायंकाळी अशा दोन सत्रात नऊशे कैद्यांचा स्वयंपाक करावा लागत आहे. पहाटे तीनपासून स्वयंपाकाचे काम सुरू करावे लागते, तर रात्रीच्या जेवणासाठी दुपारी बारापासूनच स्वयंपाकास सुरुवात होते.कळंब्यात दीडशे कैदीखून, खुनाचा प्रयत्न, खंडणी अशा गंभीर गुन्'ातील दोन डझनहून टोळ्यांना गेल्या तीन-चार वर्षांत पकडण्यात आले. यामध्ये दीडशेहून गुंड कायद्याच्या कचाट्यात सापडले. सुरक्षेच्या कारणास्तव या गुंडांना कारागृह प्रशासनाने येथे न ठेवण्याची विनंती न्यायालयास केली. न्यायालयानेही ही विनंती मान्य करून या गुंडांना कोल्हापुरातील कळंबा कारागृहात हलविण्याचा आदेश दिला. या गुंडांना सांगली कारागृहात ठेवले असते तर, आज कैद्यांची संख्या सहाशेच्या पुढे गेली असती.

 

टॅग्स :Sangliसांगलीjailतुरुंग